Social media काय आलं जगणं सगळं बदलून गेलं.

खोट्या भावना पाठवता - पाठवता,
खऱ्या भावना विसरून गेलो,
Social media काय आलं,
जगणं सगळं बदलून गेलं.

Forward message प्रमाणे,
नाती सगळी Forward झाली,
ओळखी- अनोळखी माणसे ,
नात्यांमध्ये upload झाली .

नात्यामधल प्रेम पण,
सगळं काही online भेटलं
Offline आल्यावर मात्र,
कोणीही आपलं नाही राहीलं.

मरणाला पण आज माझ्या,
Social mediaची जास्त आठवण आली,
माझा photo केवळ status वर टाकून,
भावना पण माणसांची update झाली.

तिचं ते निरागस प्रेम पण,
Social mediaमुळे upgrade झालं ,
Emojiच्या ह्या खोट्या विश्वात ,
खरं प्रेम तर बाजूलाच राहीलं.

माणसांच्या गर्दीत पण,
आज social media जास्त दिसत आहे,
खरी माणुसकी तर कधीच मेली ,
माणूस फक्तं भावनाशून्य होत आहे.

Social mediaच्या जाळ्यात अडकून,
जगणं सगळं बदलत आहे. (२)

                              कवि- विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.