पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Love at first sight.

इमेज
Gorgeous! काय दिसते रे यार ती, सहज तोंडातून उद्गार आले. जेव्हा मी तिला सृजनोत्सव मध्ये, लाल गुलाबी साडीत पाहिले. त्या लाल गुलाबी साडीमध्ये ती, लाल - लाल टमाटर दिसत होती. स्वप्नात मला आपल्याकडे खेचून, हळूच एक मुका देत होती. अरे विश्वनाथ काय झालं तुला? अचानक तिने मला प्रश्न केला. मी निरुत्तर तिला पाहतच राहिलो, हे स्वप्न तर नाही ना? मी मलाच विचारत राहिलो. 'आज तू खूप गोड दिसतेस. पाहता क्षणापासून तू मला आवडतेस. मला वाटतं माझा तुझ्यावर crush आहे', मी घाबरत - घाबरत तिला सांगितले. तिने पण लाजून, थॅंक यू, तू पण हीरो दिसतोस असे प्रतीउत्तर सांगितले. तिच्या हीरो या complimentने, माझ्या हृदयाचे ठोकेच गडबडले. Love at first sight सुद्धा असतं, हे‌ मला त्या दिवशी ‌उमजले. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

परिस्थिती मनाची.

इमेज
धीर - गंभीर मन माझे, चलबिचल होत आहे. सकारात्मक विचारांपेक्षा मनामध्ये, नकारात्मक विचार जास्त घुमत आहे. कसं आवरु ह्या वात्रट मनाला, डोकं सगळं बधीर होत आहे. वाढते कोरोना व्हायरसचे पेशंट बघून, हृदयाचे ठोके वर-खाली होत आहे. सरण पेटले आहे, मरण बोलवत आहे असे, नको नको ते विचार मनामध्ये येत आहे. चलबिचल मन‌ माझे‌ आता, माझ्या आवाक्याबाहेर जात आहे. मला तर‌ नाही ना होणार कोरोना? असा प्रश्न ते परत-परत विचारत आहे. पण परिस्थिती ही घाबरलेल्या मनाची, हळूहळू सुधारू लागली आहे. बरे होतात कोरोनाचे रूग्ण, अशी सकारात्मक बातमी जी आली आहे. पण सावरलेले मन‌ माझे आता, वेड्या मुलापरी‌ वागत आहे. कधी जाणार तू कोरोना? आता तरी जा ना तू प्लीज, अशी विनवणी तो‌ त्यालाच करत आहे. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मोबाईल.

इमेज
मांडलाय बाजार भावनांचा, संवेदनाहीन मोबाईल नावाच्या मनामध्ये. हरवले खरे हास्य मी, खोट्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये. मेंदू वजा डोकं झालंय माझं, अडकलंय मोबाईलच्या सीपीयूमध्ये. तुटली सगळी खरी नाती, फसलोय मोबाईलच्या खोट्या नात्यांमध्ये. मरून गेलं खरं प्रेम सारं, अपडेट झालंय ते ‌मोबाईलच्या स्टिकरमध्ये. भरकटलंय वेडं मन माझं, बधीर झालंय मोबाईलच्या व्हायरसमध्ये. पुसले गेले सगळे सुविचार, अश्लील मोबाईलच्या कुविचारांमध्ये. विसरून गेलोय सगळे फायदे त्याचे, कलियुगातील मोबाईलच्या राक्षसांमध्ये. फिकट झालंय पोषणयुक्त जेवण सुद्धा, पोट भरू लागलंय मोबाईलच्या विषांमध्ये. कुस्करून गेलंय जीवन सगळं, हॅंग झालंय ते मोबाईलच्या खोट्या विश्वामध्ये. मांडलाय बाजार भावनांचा, संवेदनाहीन मोबाईलच्या मनामध्ये. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

आज मी स्वप्न पाहिले होते.

इमेज
दिसताच क्षणी ती मला भावली होती, जणू काय आकाशातून अप्सराच, धरतीवर मला भेटायला आली होती. नुकतीच काय तर आमची दोस्ती झाली होती, तिच्या बरोबर बोलायची इच्छा मनात आली होती, पण साली बोबडीच तिच्या पुढ्यात बंद झाली होती. आज मात्र सगळे चित्रच बदलले होते, कधीही न बोलणाऱ्या गप्प- गप्प बसणाऱ्या माझ्या त्या अप्सरेने हळूच, मला हाका मारून बोलावले होते. तिच्या त्या हाकेने माझे‌ हृदयच पिघळले होते, तिच्या तोंडून माझेच नाव परत परत ऐकताना, कान पण सुन्न झाले होते. "ऑई विश्वनाथ! ऑई विश्वनाथ!" तिचे ते शब्द अजूनही, माझ्या कानात घुमत होते, घुमत - घुमत प्रेमाचे गीत वाजवत होते. आजच्या मराठी तासाला तिला खूश करण्यासाठी, मी माझ्या ‌काही कवितांचे‌ सादरीकरण केले‌ होते, कविता सादर करतांना तिला माझी राणी करण्याचे, आज मी स्वप्न पाहिले होते. आज मी स्वप्न पाहिले होते.             कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मी म्हणालो शब्दांना.

इमेज
मी म्हणालो शब्दांना तिला पण भेटून ये. तिचे चित्र माझ्या मनात व माझे तिच्या मनात हळूच कोरून घे. माझ्या मनातले तिला व तिच्या मनातले मला हळूच सांगून ये. माझा स्पर्श तिच्या गालांवर व तिचा स्पर्श माझ्या गालांवर हळूच करून ये. तिला माझ्या मिठीची ऊब व मला तिच्या मिठीची ऊब हळूच देऊन ये. तिला प्रत्येक क्षणाला माझी आठवण व मला प्रत्येक क्षणाला तिची आठवण हळूच करून दे. दगदगीच्या ह्या जीवनात काही, प्रेमाचे क्षण आम्हाला हळूच घालवू दे. मी म्हणालो शब्दांना तिला पण भेटून ये. कवितेत तरी तिला माझी प्रेयसी व्हायला व तिचा मी प्रियकर व्हायला हळूच एक कविता लिहून दे.(२)  कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

हरवलेत शब्द.

इमेज
हरवलेत शब्द कुठेतरी, मला भेटत पण नाहीत. काळोखानंतर उगवणार सूर्य, याची शाश्वती मला दिसत नाही. एवढं काय म्हणून घडलं, मला काहीच उमजत नाही. करून मला पोरकं वांझ, कविता मला भेटायला येत नाही. डोकं झालय सगळं‌ सुन्न, एक शब्दसुद्धा सुचत नाही. प्रेम, समाज, निसर्ग विषयक शब्द काहीच बोलत नाही. कुठे हरवलय रे मी मित्रा तुला, माझ्या आतला कवी मला सापडत नाही. नाळ माझी आणि तुझी तुटली अशी, काही केल्या परत जोडत नाही. रडून- रडून पोखळ झालोय मी आतून, तरी दुःख‌ माझे त्याला समजत नाही. मरत नसतो कवी कुठलाच, हे‌ बोलसुद्धा कानाला समाधान देत नाही. आत्मा कसा माझा भरकटला असा, काही केल्या माझ्या आत तो येत नाही. आत्ता शेवटची एकच ईच्छा राहिली आहे, तिला पण हा दुरावा सहन होत नसेल. कदाचित हरवलेत जरी शब्द मी, ती मला असं एकटं सोडून जाणार नाही.(२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.